शनिवार, १२ एप्रिल, २०१४

आत्मशोध !

आत्मशोध !

१) स्वतःकडे जेव्हा काही दाखवण्यासारखे गुण नसले की मी इतर लोक कसे नालायक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो . 

२) माझे नसलेले कर्तुत्व सिद्ध करण्यासाठी मला वारंवार माझ्या जाती धर्मातील महा पुरुष्यांच्या कर्तुत्वाचे दाखले द्यावे लागतात . 

३) माझ्या कमतरता शोधून त्या दूर करण्याएवजी मी समाज सुधारणेच्या मोठ्या गप्पा मारून स्वतचे समाधान करून घेत असतो .

४) मला नेहमी माझ्यावर 'अन्याय ' होतोय असे वाटत राहते त्यामुळे तसे न होण्यासाठी मी ' आक्रमक ' पवित्रा घेत असतो .

५) मला दिवसभरात कोणालातरी कशावरून तरी उघड अथवा मनातल्या मनात शिवीगाळ केल्याशिवाय चैन पडत नाही आणि तसे केले नाही तर माझी बंडखोरी आणि क्रांतिकारी वृत्ती नष्ट होईल आणि लोक मला भेकड समजतील असे मला वाटते .

६) मला वैचारिक विरोध देखील सहन होत नाही कारण समस्त जगात मीच एकमात्र शहाणा आहे असा माझा पक्का समज असतो .

७) मानवता , समानता , हे शब्द वारंवार माझ्या बोलण्यात येतात मात्र या सर्व गोष्टी माझ्या कृतीमध्ये नसतात

८) व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली मी स्वैराचार करत असतो आणि तो मला देशाच्या घटनेने दिलेला अधिकार आहे अशी माझी समजूत आहे .

९) मी कधीही एखाद्या भिकाऱ्याला १ रुपया देखील न देता समाजाचे भले करण्याची स्वप्ने पाहतो .

१० ) परमेश्वराने मला खास निर्माण केलेले असून मी आहे तसाच अतिशय चांगला आहे आणि तसाच राहणार या समजुतीतून मी परिस्थिती , लोक वैगरे बदलले पाहिजेत असा प्रचार करतो .

वरील गोष्टी जर माझ्यात आढळल्या तर मला नक्कीच मानसोपचार तज्ञाची गरज आहे हे समजावे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा